मराठा-ओबीसी संघर्ष पेटला: लक्ष्मण हाके यांचा जरांगे-पाटलांवर जोरदार हल्ला

प्रतिनिधी/ नागपूर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्याची घोषणा केल्यापासून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच, ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे-पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना हाके यांनी जरांगे-पाटील […]

Continue Reading

मनसेची चिंता वाढली: कल्याण-डोंबिवलीतील मनसेचे प्रमुख पदाधिकारी शिंदे गटात.

प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच उलथापालथी होत असतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्याचे प्रतिबिंब उमटते. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) दिलेला एक मोठा धक्का राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. मनसेचे अनेक माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी शिंदे गटात सामील झाल्याने स्थानिक राजकारणाची समीकरणे बदलताना दिसत आहेत. […]

Continue Reading

राष्ट्रभक्ती की अर्थकारण? भारत-पाक क्रिकेट सामन्यावरून ठाकरे गटाची भाजपवर ‘सडकून ‘ टिका: “धंदो प्रथम, वंदे मातरम!” हाच भाजपचा नारा

 फडणवीसांचे विधान या वादाची ठिणगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानाने पडली. भारत–पाक क्रिकेट सामन्यालाविरोध करणाऱ्या ठाकरे गटावर टीका करताना त्यांनी पाक क्रिकेटपटू जावेद मियाँदादला घरी जेवायला बोलावणाऱ्यांनी यावर बोलूनये, असे म्हटले. या विधानानंतर ठाकरे गटाकडून भाजपवर जोरदार हल्ला चढवण्यात आला. अंबादास दानवे यांचा भाजपवर पलटवार: “हा सामना अर्थकारणाच्या चष्म्यातून पाहता!” ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज भाजपवर जोरदार हल्ला चढवला. असुन त्यावर बोलताना दानवे म्हणालेकी “देवेंद्रजी, हिंदुस्थान–पाक सामन्यांवरून थेट हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत आपल्याला जाण्याचे कारण नाही,” असेते म्हणाले. बाळासाहेबांनी घरी आलेल्या पाहुण्यांचा आदर केला, ही आपली महान संस्कृती आहे, ती त्यांनी जपली. मात्र, त्यांनीविमान वळवून न बोलावता पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा केक कापण्यासाठी ते पाकिस्तानात गेलेले नव्हते, असा टोला त्यांनीपंतप्रधानांना लगावला. दानवे पुढे बोलताना असे देखील म्हणाले की, “आपल्या बहिणींचे कुंकू पुसण्याचे कुकर्म करणाऱ्या लोकांसोबत सामने न खेळण्याचाबाळासाहेबांचा सिद्धांत कायम राहिला, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. हे असले भाष्य करून आपण त्यांच्या राष्ट्रभक्तीवर बोटदाखवत आहात का?”असा सवाल करत त्यांनी त्यांनी”धंदो प्रथम, वंदे मातरम! हाच आपल्या भाजप पक्षाचा नारा आहे, कारण तुम्हीहिंदुस्थान–पाकिस्तान सामना अर्थकारणाच्या चष्म्यातून पाहता. आमच्यासाठी तो राष्ट्रभक्तीचा विषय आहे! ते तुम्हाला कळणारनाही. कळले तरी वळणार नाही,” असे खरमरीत विधान त्यांनी केले. ‘अर्धवट ज्ञानी‘ म्हणत  खासदार संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. असुन ते पुढे बोलताना म्हणाले कि देवेंद्र फडणवीस हे अर्धवट ज्ञानी आहेत. मुळात संपूर्ण भाजपच अर्धवट ज्ञानी आहे. भाजपवाल्यांच्या गुडघ्यातही मेंदूनाही,” अशी बोचरी टीका त्यांनी केली. जावेद मियाँदाद मातोश्रीवर का आले होते आणि त्यावेळी बाळासाहेबांची भूमिका काय होती, यावर राऊत यांनी प्रकाश टाकला. “जावेद मियाँदाद हे बाळासाहेबांना भेटायला आले होते. भारत–पाकिस्तान क्रिकेटला विरोध करू नका, असे ते सांगणार होते. पणबाळासाहेबांनी त्यांना चहा घ्यायला सांगितला आणि परत पाठवले. दहशतवाद आणि क्रिकेट या दोन्ही गोष्टी एकत्र चालणार नाही, असे बाळासाहेब त्यांना म्हणाले होते,” असे राऊत यांनी आठवण करून दिली. राऊत यांनी पंतप्रधान मोदींवरही अप्रत्यक्ष निशाणा साधत म्हटले की, “बाळासाहेबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखी शेपूटघातली नव्हती. तुम्हाला कुंकवाची कदर असेल, तर अशी विधाने करू नका. तुम्ही आरशाची फॅक्टरी सुरू केली आहे, पण त्यामध्येतुम्हाला तुमचेच खरे रूप दिसेल.” त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना थेट प्रश्न विचारला की, “पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यासतुमचा पाठिंबा आहे की नाही? हे पहिल्यांदा सांगा.” पैशांसाठी भाजपने ‘पाकड्यांसमोर शेपूट घातली‘ असल्याचा गंभीर आरोपहीसंजय राऊत यांनी यावेळी केला. पुढील राजकीय पडसाद ठाकरे गटाच्या या तिखट टीकेमुळे भाजपमधून संतप्त प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. भारत–पाकिस्तान संबंध, राष्ट्रभक्ती आणि क्रिकेट या नेहमीच भावनाप्रधान मुद्यांवरून सुरू झालेल्या या राजकीय युद्धात आतापुढील काळात आणखी कोणते आरोप–प्रत्यारोप होतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मात्र, या वादामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातएक नवा अध्याय सुरू झाला आहे, हे निश्चित.

Continue Reading

लोकसभेत ‘ऑनलाइन गेमिंग विधेयक’ मंजूर : मनी गेम्सवर कडक नियंत्रण, ई-स्पोर्ट्सला कायदेशीर मान्यता

प्रतिनिधी : नवी दिल्ली:  देशात ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या प्रभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि जबाबदार गेमिंग वातावरणाला चालना देण्यासाठीभाजप सरकारने आणलेले ‘ऑनलाइन गेमिंग प्रमोशन अँड रेग्युलेशन बिल‘ लोकसभेत नुकतेच मंजूर झाले आहे. या महत्त्वपूर्णविधेयकामुळे आता ऑनलाइन मनी गेम्सवर कठोर कायदेशीर कार्यवाही होणार असून, दुसरीकडे ई–स्पोर्ट्स आणि सोशल गेम्सच्याविकासाला गती मिळून त्यांना अधिकृत प्रोत्साहन दिले जाणार आहे. खेळाडूंना दिलासा, प्रमोटर्सना चाप या विधेयकाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, ऑनलाइन मनी गेम्स खेळणाऱ्या सामान्य खेळाडूंनाया कायद्याअंतर्गत कोणतीही शिक्षा होणार नाही. मात्र, असे मनी गेम्स जनतेला ऑफर करणारे, त्यांच्यासाठी सेवा पुरवणारे, त्यांचीजाहिरात करणारे किंवा अशा खेळांना आर्थिक मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाईची या कायद्यात तरतूद करण्यात आली आहे. तसेच यात शिक्षेची  तरतूद काय सांगते?  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन कायद्यानुसार मनी गेम्सना प्रोत्साहन देणे किंवा ते ऑफर करणे हा गंभीर गुन्हा मानलाजाईल. यासाठी ३ वर्षांपर्यंत कारावास आणि १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. तर, अशा मनी गेम्सची जाहिरात करणाऱ्यांना२ वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा ५० लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. मनी गेमशी संबंधित आर्थिक व्यवहारात सहभागी असलेल्यांवरही३ वर्षांपर्यंत कारावास आणि १ कोटी रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल. विशेष म्हणजे, जर एखाद्याने हा गुन्हा पुन्हा केला, तरशिक्षेची व्याप्ती वाढून ३ ते ५ वर्षांपर्यंत कारावास आणि २ कोटी रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. हे सर्व गुन्हे दखलपात्रआणि अजामीनपात्र स्वरूपाचे असतील,  तपास यंत्रणांना  या विधेयकामुळे  मनी गेमिंगशी संबंधित प्रकरणांमध्ये मोठे अधिकार प्राप्त झाले आहेत. संशयास्पद आर्थिकव्यवहार तपासणे, डिजिटल तसेच इतर मालमत्ता जप्त करणे आणि काही विशिष्ट प्रकरणांमध्ये वॉरंटशिवाय छापे टाकणे व अटककरणे यासाठीही तपास अधिकाऱ्यांना अधिकृत करण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे असतील. यामुळे मनी गेमिंगच्या जाळ्याचा छडालावणे अधिक सोपे होईल, असे बोलले जात आहे. त्याच बरोबर आता ई–स्पोर्ट्स आणि सोशल गेम्सना चालना एकीकडे मनी गेम्सवर प्रतिबंध आणला जात असतानाच, केंद्र सरकारनेई–स्पोर्ट्स आणि ऑनलाइन सोशल गेम्सच्या भविष्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले आहे. आतापर्यंत कायदेशीर मान्यतानसलेल्या ई–स्पोर्ट्सला युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून एक विशेष कायदेशीर चौकट तयार करून दिली जाईल. तसेच, भविष्यात ऑनलाइन सोशल गेम्सनाही सरकारकडून प्रोत्साहन मिळेल, असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे खेळाडूआणि उद्योजकांना एक सुरक्षित आणि कायदेशीर व्यासपीठ उपलब्ध होईल. असे सरकारचे मत आहे सरकारचे स्पष्टीकरण: सामाजिक समस्यांवर नियंत्रण या विधेयकामागची भूमिका स्पष्ट करताना सरकारने म्हटले आहे की, ऑनलाइन मनी गेम्समुळे समाजात अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. यात आर्थिक फसवणूक, मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याने खेळाडूंचे व्यसन, कुटुंबांमध्ये कलह आणि काही प्रकरणांमध्ये आत्महत्येसारख्या दुर्दैवी घटनांचा देखील समावेशआहे.त्यामुळे नागरिकांचे हित जोपासण्यासाठी कठोर पावले उचलणे अनिवार्य होते  असे सरकारने नमूद आहे. या  विधेयकामुळे ऑनलाइन गेमिंग क्षेत्राला एक नवी दिशा मिळेल आणि ते अधिक जबाबदार व सुरक्षितबनेल, अशी अपेक्षा  सरकार कडून व्यक्त केली जात आहे.

Continue Reading

छत्रपती संभाजीनगरमध्ये CA ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा सिलिंडर स्फोटात जागीच मृत्यू.”

प्रतिनिधी: छ.संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमधील एका दुःखद घटनेने मानसिक आरोग्याच्या महत्त्वाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. बुधवार, २० ऑगस्टरोजी, न्यू शांतिनिकेतन कॉलनीत राहणाऱ्या २० वर्षीय ओम संजय राठोड या तरुणाचा गॅस सिलिंडर स्फोटात मृत्यू झाला. चार्टर्डअकाउंटन्सी (CA) चा अभ्यास करणारा ओम मानसिक ताणाने ग्रस्त होता,  प्राथमिक स्त्रोताकडून मिळालेल्या माहितीनुसार, राठोडने प्रथम पंख्याला साडीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशीठरला. त्यानंतर त्याने घराचे दार बंद केले आणि गॅस सिलिंडरमध्ये कात्री खुपसून स्फोट घडवला. या भीषण स्फोटामुळे धावतआलेले लोक हळहळ व्यक्त करत होते. अग्निशमन दलाने तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले आणि जखमी ओमला घाटीरुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जवाहरनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यातआली असून पोलिस पुढील तपास करत आहेत. ही घटना केवळ दुर्दैवी नाही, तर एक गंभीर संदेशवाहक आहे. CA सारख्या स्पर्धात्मक आणि ताणपूर्ण अभ्यासक्रमामुळे अनेकयुवक–युवती मानसिक ताणाला सामोरे जातात. ओमचा मृत्यू या ताणाच्या भयानक परिणामाचे प्रतीक आहे. ही घटना समाजालामानसिक आरोग्याविषयी जागरूक राहण्याची आणि गरजूंना मदत करण्याची व आठवण करून . पालक, शिक्षक आणि मित्रांनाविद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.

Continue Reading

सततच्या पावसाने झोडपले, प्रशासकीय नियमांनी अडवले!

पंचनाम्यासाठी जिओ-टॅग फोटोची सक्ती; धाराशिव जिल्ह्यात शेतकरी हैराण, लोकप्रतिनिधींचा प्रशासनाला सवाल. धाराशिव, दि. [२०] : (प्रतिनिधी) एकीकडे मुसळधार पावसाचा मारा आणि दुसरीकडे सरकारी नियमांची कोंडी, या दोन्ही संकटात धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी सापडला आहे. जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे. शेतकऱ्यांची पिके पाण्यात गटांगळ्या खात पडली असून, शेतकरी हवालदिल झाला […]

Continue Reading

बृहन्मुंबई महानगरपालिका  निवडणुकीआधी ‘परिवहन’मध्ये ठाकरे बंधूंना मोठा धक्का! एकत्र लढवलेल्या पहिल्याच निवडणुकीत दारुण पराभव,

मुंबई: राज्याच्या राजकारणात सध्या अनिश्चिततेचे ढग दाटले असताना, मुंबईतील एका छोट्या पण महत्त्वाच्या निवडणुकीच्या निकालाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात, अशा स्थितीत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी संबंधित पॅनेलला मुंबई परिवहन विभागाच्या (पूर्वीची बेस्ट) कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत दारुण पराभवाला […]

Continue Reading

तुळजापूर मंदिर विकास बैठक वादाच्या भोवऱ्यात: लोकप्रतिनिधींना डावलून वादग्रस्त व्यक्तीला निमंत्रण?

धाराशिव (प्रतिनिधी) – श्री तुळजाभवानी मंदिराच्या बहुप्रतिक्षित विकास आराखड्याच्या बैठकीत एक मोठा वाद उफाळून आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि खासदार यांसारख्या वरिष्ठ लोकप्रतिनिधींना हेतुपुरस्सर डावलण्यात आल्याचा आरोप होत असताना, एका कुख्यात मटका व्यावसायिकाची बैठकीतील उपस्थिती ही संतापाचे मुख्य कारण ठरली आहे. या गंभीर प्रकारामुळे जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, प्रशासनाच्या भूमिकेवर […]

Continue Reading

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान: एक गंभीर समस्या

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अवकाळी पावसाचा फटका ही नवी गोष्ट राहिलेली नाही. दरवर्षी पिकांच्या हंगामात कधी अतिवृष्टी, कधी गारपीट, तर कधी दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तींना त्यांना तोंड द्यावे लागते. परंतु, यंदा पुन्हा एकदा झालेल्या मुसळधार व संततधार पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान घडवले आहे. अथक परिश्रमाने उभी केलेली पिके काही तासांच्या पावसात अक्षरशः जमीनदोस्त झाली […]

Continue Reading

शासकीय खुर्चीत गाणं म्हणणं भोवलं: रेणापूरच्या तहसीलदारांना तात्काळ निलंबित; व्हायरल व्हिडीओ पडला महागात

लातूर, दि. १७ ऑगस्ट: लातूर जिल्ह्याच्या रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात यांना निरोप समारंभात शासकीय खुर्चीत बसून गायन सादर करणे चांगलेच महागात पडले आहे. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर महसूल प्रशासनाने याची गंभीर दखल घेत, थोरात यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत. शासकीय पदाची मानमर्यादा न राखल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. […]

Continue Reading